पोस्ट्स

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

इमेज
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या होऊन आज 34 वर्षे झाली. ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी मी शाळेत होतो. राजकारण आताही कळत नाही आणि तेव्हाही कळत नव्हतं. पण राजीव गांधींबद्दल जबरदस्त आकर्षण होतं. त्यामुळं त्यांची हत्या झाली कळल्यावर खूप हळहळ वाटली होती. नेमकं आत्ताच "राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट?" हे फराझ अहमद लिखित आणि अवधूत डोंगरे अनुवादित मराठी पुस्तक वाचण्यात आलं. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २१ मे १९९१ रोजी झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर एक संशयास्पद आणि धक्कादायक दृष्टिकोन या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. राजीव गांधीबद्दल असं काही होऊ शकतं असा विचारही सर्वसामान्यांच्या मनात येणार नाही. परंतु, पुस्तकात जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावरून आपल्याही मनात शंका यायला सुरूवात होते. लेखकानं अधिकृत तपासण्या आणि अहवालांमध्ये नोंदवलेल्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या हत्येमागे केवळ एलटीटीईचाच हात नव्हता, तर भारतातील काही अंतर्गत शक्तींचाही सहभाग असू शकतो, असा दावा केला आहे. पुस्तकात लेखकाने विविध तपशील, पुरावे आणि घटनांची साखळी उलगडत, या हत्येच्य...

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

इमेज
- दिग्विजय जिरगे चंद्रभानु गुप्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांचा कल सिंडिकेट ग्रूपकडे झुकला होता म्हणजे त्यांनी सिंडिकेटला जवळ करण्यास सुरुवात केली होती. तर चंद्रभानु गुप्ता यांचे निकटवर्तीय बनारसीदास गुप्ता हे इंदिरा गांधी यांना भेटायला गेले होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना बसण्यासही सांगितलं नाही. बनारसीदास यांच्याकडे न पाहता फाईलीत डोकं घालून बसलेल्या इंदिरा गांधी या मान वरही न करता त्यांना म्हणाल्या, मेरा बाप संत था...मैं नही हूं! हा किस्सा सांगितलाय ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी... भारतात रियल पॉलिटिक्सची सुरुवात इंदिरा गांधी यांनी केली. राजकारणाला आर्ट-सायन्समध्ये परावर्तीत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना पॉवरचं कॅरेक्टर चांगलं समजलं होतं. साम-दाम-दंड-भेदाच्या राजकारणाच्या त्या मास्टर होत्या, असे नीरजा चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी 'How Prime Ministers Decide' हे पुस्तक लिहिलं आहे. आपल्या पुस्तकात त्यांनी 6 पंतप्रधानांवर लिहिलं आहे. 600 पानांचं हे जाडजुड असं हे पुस्तक आहे. भारतीय राजकारणातील अनेक घटना, घडामोडींच्या त्या 'आय विटनेस' आहे...

मिस न होणारं मिसिंग...

इमेज
पेपर उघडल्यानंतर पानभर जाहिराती पाहून आपण थोडं वैतागतो. परंतु, जाहिरातींच्या गर्दीत काही जाहिराती अशा असतात की तुमचं लक्ष जातंच आणि ती जाहिरात कितीही मोठी असली तरी आपण वाचतोच. आता ही जाहिरात पाहा... कदाचित क्वार्टर पेज जाहिरात असेल. भारीतला शेरवानी, त्यावर आभूषणं यामुळे आधीच हँडसम असलेला मुलगा या कपड्यांमध्ये एखाद्या राजकुमारापेक्षाही कमी दिसत नाही. पण या फोटोच्या वर मिसिंग असं शीर्षक आहे. त्यामुळे वाचकाचं लक्ष लगेच तिकडे जातं. हे असं कसं.... वाचकांच लक्ष आकर्षित करणारी सुलतानची जाहिरात मग्रूर सावकार आणि बनाना चिप्स...Beyond Snack जाहिरात लिहिलीय पण एकदम भारी. सुरुवातीला मुलाचं वर्णन दिलं आहे. केवळ त्याच्या दोन मागण्या मान्य न केल्यामुळे तो घरातून गायब झाला आहे. त्यामुळे घरच्यांनी तो मिसिंग असल्याची जाहिरात देऊन त्याच्या दोन्ही मागण्या म्हणजे त्याला ज्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे तिच्याशी लग्न लावून द्यायला आणि त्याच्या आवडीच्या सुलतान-द शेरवानी किंग मधून शेरवानी घ्यायला तयार असल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर सुलतानची नवीन शाखा सुरु झाली असून तिथं पार्किंगची कोणतीच समस्या नसल्याचे म्...

मग्रूर सावकार आणि बनाना चिप्स...Beyond Snack

इमेज
सोनं दाताखाली चावून त्याची शुद्धता किंवा अस्सलपणा ओळखण्याची जुनी पद्धत केळीच्या चिप्ससाठी (ज्याचा रंग सोन्याप्रमाणे पिवळा असतो) वापरण्याची जबरदस्त कल्पना या जाहिरातीत वापरण्यात आली आहे. ब्रँड आणि ब्रँडिंगच्या विश्वाची सफर 'ब्रँडनामा' या जाहिरातीसाठीचे कलाकार आणि सेटअपही भारी आहेत. गावातील मग्रूर सावकार लोकांकडून सोनं घेऊन पैसे देत असतो. यासाठी त्यानं एक छोटसं मशीन आपल्या जवळ ठेवलं आहे. सोनं चावून त्याप्रमाणे तो लोकांना त्या मशीनमधून पैसे देतोय. त्याचवेळी एकजण खोटं सोनं देतो. ते सोनं सावकारानं दाताखाली घेताच त्याचे तुकडे होतात. सावकाराची लोकं लगेच त्या माणसाला उचलून नेतात. यावेळी वापरलेलं बॅकग्राऊंड म्युझिक प्रसंगाला अनुरुप आहे. बियाँड स्नॅक्सचे केळीचे चिप्सही सोन्यासारखे अस्सल असल्याचे अत्यंत स्मार्ट पद्धतीनं या जाहिरातीत दाखवलं आहे. प्रेझंटेशन चांगलं झालं आहे. बालाजी वेफर्स, भाजी मंडई आणि लादेन जाहिरात एजन्सी- Sterling AG - डॉ. दिग्विजय जिरगे #जाहिरात #advertisement #creative

भावनेला अलगद स्पर्श करणारी जाहिरात - Brooke Bond Red Label

इमेज
काही प्रॉडक्टच्या जाहिराती नेहमी मनाला स्पर्श करणाऱ्या असतात. ब्रुक बाँड रेड लेबल (Brooke Bond Red Label) हे उत्पादन त्यापैकी एक. सध्याची त्यांची नवी जाहिरात ही भावनेला हात घालणारी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे यात काम केलेल्या सुलभा आर्य यांच्या अभिनयामुळे ही जाहिरात एका वेगळ्याच उंचीवर जाते. (Creative and Emotional Advertisement of Brooke Bond Red Label) तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट... सुलभा आर्य यांचा निरागस अभिनय (Sulbha Arya's Best Acting) घरासमोर असलेल्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या अनोळखी लोकांना म्हणजे रुग्णासोबत आलेल्यांना सुलभा आर्य या चहा देताना यात दाखवण्यात आले आहे. तणावात असलेल्या लोकांना घोटभर चहा देऊन त्याचबरोबर त्याची आपलेपणाने चौकशी करुन त्यांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न त्या करत असतात. सुरुवातीला चहा नको म्हणणारी व्यक्ती नंतर चहाचा सुवास येताच मागून चहा पितो आणि गप्पांच्या ओघात तो आपला तणाव काही वेळासाठी विसरुन जातो, असं यात दाखवण्यात आलं आहे.  सुलभा आर्य यांच्या निरागस अभिनयामुळे ही जाहिरात वेगळ्या उंचीवर जाते. त्या गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहेत....

तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट...

इमेज
ज्यांच्या घरी लहान मुलं असतात तिथं हमखास चालणारा हा संवाद. ते छोटं मूल रोजचे शब्द चुकीचं उच्चारत असतं. त्यांना ती, तो, ते (gender of things) याच्यातील फरक समजत नसतो... ते हमखास 'तो' असेल तर 'ती' चा शब्दप्रयोग करतात किंवा 'ती' असेल तर 'तो' असं म्हणतात. मुलांनी असा चुकीचा उच्चार केला की आई-वडील-आजी-आजोबा लगेच त्यांना तो उच्चार कसा चुकीचा आहे, हे सांगतात. आमच्या घरीही असे प्रकार होतात. माझा मुलगा विराज पूर्वी असा घोळ घालायचा आता छोटी शताक्षी असं करते.  हेही वाचा-   अभिनेत्री ते यशस्वी स्टार्टअपचा प्रवास अगदी हेच ल्युमिनियस या इन्व्हर्टर उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत दिसून येतं. महिला दिनाच्या निमित्ताने ग्रे ग्रूपने ही जाहिरात तयार केली आहे. जाहिरात बरोबर लाईटशी कनेक्ट केली आहे. ही जाहिरात बेस्टच झाली आहे. प्रत्येकाला आपल्या घरात असे घडलेले किस्से लगेच समोर येतील.  जाहिरातीची ही कल्पना मोठ्या ब्रँडला पटवून विकणे हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर ल्युमिनिअसनेही अशी जाहिरात करुन एक धाडसी पाऊल उचललं आहे. हेही वाचा-  जगातील सर्वात मोठं स्कल्पचर केरळमधील...

अभिनेत्री ते यशस्वी स्टार्टअपचा प्रवास

इमेज
तिरुपती बालाजी मंदिर येथून ही केस (Hair) खरेदी करते आणि स्वतःच्या वेबसाईटवर ते विकून महिन्याला लाखो रुपये कमावते.  पारुल गुलाटी तिचे नाव असून 'निश हेअर'ची ती संस्थापिका आहे. पारुल एक अभिनेत्री, कंटेट क्रिएटर आणि उद्योजिका आहे. नुकताच ती शार्क टँक इंडियामध्ये आली होती. पारुलने काही सिनेमे, वेब सिरिज आणि मालिकांमधून काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर ती भरपूर चर्चेत आहे.  भारतातील लाखो, कोट्यवधी महिला केस गळतीसह केसांच्या इतर समस्येला सामोरे जातात. अनेकजण यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. फॅशन आणि ब्यूटी इंडस्ट्रीच्या पलीकडचा विचार पारुलने केला. देशात चांगल्या दर्जाच्या मानवी केसांच्या व्यवसायाची वाट तिने धरली. त्यातूनच तिने २०१७ मध्ये भारतातील पहिले ऑनलाइन हेअर एक्स्टेंशन सुरु केले. पहिले दोन वर्षे तिने विविध ठिकाणी स्टॉल्स लावून डेमो दाखवले, लोकांना हेअर एक्स्टेंशनबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिलाही कोविडचा फटका बसला. कोरोना महामारीमुळे फिजिकली डेमो दाखवणे बंद झाले.  तेव्हाच तिने पर्सनल ब्रँडिंगच्या पॉवरचा फायदा घेतला. मग तिने इन्स्टाग्रामवर रिल्स पोस्ट करण...

पुन्हा 'कॅम्पा कोला' म्हणजेच 'The Great Indian Taste'

इमेज
थम्स अप, कोका कोला, पेप्सी आणि इतर कोल्ड ड्रिंकला टक्कर देण्यासाठी अंबानींनी म्हणजेच रिलायन्सने (Reliance) 'कॅम्पा कोला' (Campa Cola) रिलाँच केलं आहे (कॅम्पा ब्रँड हा तसा जुना आहे. रिलायन्सने तो खरेदी केला आहे.). त्यामुळे आता कोल्ड ड्रिंक कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा 'कोल्ड वॉर' सुरु होणार असं दिसतंय. रिलायन्स सध्या ज्या बिझनेसमध्ये उतरतंय (जियो वगैरे) ते पाहता या क्षेत्रातही आता 'कर लो दुनिया मुठ्ठी मैं' असंच होण्याची शक्यता आहे.  रिलायन्ससारखा ब्रँड कॅम्पा कोला घेऊन येतंय म्हटल्यावर आता या मार्केटमधील दिग्गज कंपन्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलली असणार. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत आता आपल्याला क्वॉलिटी, क्वाँटिटी, प्राइस त्याचबरोबर जाहिरात जगतात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कॅम्पा कोलाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण असणार याची उत्सुकता आता आहे आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडरसाठी रिलायन्स पैसा गुंतवायला मागे पुढे पाहणार नाही हे मात्र खरं आहे. जाहिरातीच्या दृष्टीने 'कॅम्पा कोला'वर थोडीशी नजर टाकूयात. कॅम्पा ब्रँड नावाचा फायदा घेण्यासाठी रिलायन्स जाहिरात करताना त्यांच्...

हवं तेवढं पॅकेज पाहिजे? मग सॅलरी ठरवताना द्या या गोष्टींकडे विशेष लक्ष

इमेज
 

योग्य करिअर निवडा या टिप्सच्या मदतीने

इमेज
  यश मिळवायचं असेल तर स्वतःसाठी योग्य कार्यक्षेत्र आणि अनुकूल करिअर निवडणे गरजेचे आहे (How to choose perfect career in marathi), पण हे साध्य कसं करायचं?, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. पण हा महत्त्वाचा निर्णय घेताना या गोष्टींकडे तुम्ही जरा लक्ष द्या:  स्वतःच्या योग्यतेकडे लक्ष द्या आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये रस किंवा इंटरेस्ट आहे, हे तपासून पाहा.  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्या. यामुळे तुम्हाला योग्य आणि वास्तविक माहिती मिळू शकते. याच्या मदतीने एक स्पष्ट लक्ष्य समोर ठेवून तुम्ही तुमचे करिअर निवडू शकता.  विविध क्षेत्रांचा अभ्यास करा आणि कोणत्या क्षेत्रात करिअर डेव्हलपमेंट आणि यश मिळण्याच्या चांगल्या संधी आहेत, हे तपासून पाहा.  जॉब वातावरण, पगार, स्थिरता आणि जॉब सिक्युरिटीचाही विचार करा. 

जगातील सर्वात मोठं स्कल्पचर केरळमधील 'जटायू अर्थ सेंटर'

इमेज
केरळ मधील कोल्लम शहरापासून अगदी जवळ जटायू अर्थ सेंटर (Jatayu Earth’s Center) इथं जटायूचं अत्यंत सुंदर आणि मोठं स्कल्पचर ( Jatayu Rock)  आहे. जगातील हे सर्वात मोठं स्कल्पचर असल्याचं सांगितलं जातं. पौराणिक कथेनुसार, ज्यावेळी रावण सीतेचं अपहरण करून नेत होता, त्यावेळी रावणाशी लढताना जटायू पक्षी खाली पडला होता. त्याच ठिकाणी हे स्कल्पचर आहे. हे स्कल्पचर ही अर्ध्या पंखाचं आहे. डोंगरावर हे स्कल्पचर उभारण्यात आलं आहे. हे स्कल्पचर 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 70 फूट उंच आहे. प्रख्यात मल्याळम फिल्ममेकर राजीव आंचल यांनी 15000 स्क्वेअर फूट प्लॅटफॉर्मवर हे उभारलं आहे. सुमारे 896 पायऱ्या चढून वर जावं लागतं. वर 6 D थिएटर, डिजिटल म्युझियम आहे, पण सध्या कोरोना मुळं हे बंद आहे. बाजूला प्रभू श्रीरामाचे रेखीव मंदिर आहे. वर जाण्यासाठी रोप वे ही आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, गेम झोन, आयुर्वेदिक रिसॉर्ट ही आहे. सर्वांनी पाहावं असं हे ठिकाण आहे...वर जाताना प्रत्येकाच्या फिटनेसचा कस लागतो, हे मात्र नक्की.. जवळचं विमानतळः त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सुमारे 52 किमी आहे. जवळचं रेल्वे स्टेशनः कोल्लम...

ब्रँड आणि ब्रँडिंगच्या विश्वाची सफर 'ब्रँडनामा'- Brandnama

इमेज
हल्ली प्रत्येक क्षेत्रात ब्रँड आणि ब्रँडिंगला खूप महत्त्व आलं आहे...स्पर्धा तीव्र झाली आहे..एकाच वस्तूची अनेक उत्पादनं बाजारात आहेत..प्रत्येक जण आपलं उत्पादन वेगळं आणि चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय...प्रत्येकाला त्याच्या उत्पादन, सेवांचा खप वाढवायचा आहे...सगळेजण मार्केटिंग करत आहेत..पण ब्रँडिंगकडे खूप कमी जणांचं लक्ष आहे...स्वतःचा ब्रँड निर्माण करणे ही वरवरची प्रक्रिया नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करुन आपला ब्रँड निर्माण केला जातो. आज ग्राहकांचाही ब्रँडेड वस्तू घेण्याकडे कल असतो. अनेकांचे उत्पादन चांगले असते पण त्यांचा ब्रँड नसल्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ब्रँडचे महत्त्व हळूहळू लोकांना पटायला लागले आहे..आता राजकारणातही ब्रँड तयार होत आहेत.  ब्रँड म्हणजे काय, ब्रँडिंग कसं केलं जातं ? याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात..यासाठी काय करायचं असतं हेही माहीत नसतं. ब्रँडबाबतची इत्यंभूत माहिती सहज, सोप्या भाषेत अभिजित जोग यांनी आपल्या 'ब्रँडनामा' या पुस्तकात मांडली आहे. अभिजित जोग हे जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव. पुण्यात प्रतिसाद कम्युनिकेशनच्या माध्यमातून गेल्या ३०...

कोरोना...वृत्तपत्र आणि बदललेली सवय

इमेज
गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी बदलल्या.. या काळात माझ्या करिअरनेही काही फेरबदल बघितले...सर्व काही सुरळित होत आहे असं वाटत असतानाच पहिल्या लाटेपेक्षाही भयानक अशी दुसरी लाट आली...आणि जवळचे आणि नेहमी संपर्कात असणारी लोकं सोडून जाऊ लागली...हे पचवणं खूपच अवघड होतं...हा आजार आता जवळ पोहोचला आहे...गेल्या वर्षी कोसो दूर असलेला हा कोरोना (Covid-19) आता अगदी दिवाणखान्यात पोहोचला आहे. यामुळे लोकांना सवयी बदलाव्या लागल्या आहेत. म्हणजे काही सवयी बदलाव्या लागल्या तर काही आपोआप बदलल्या.. कारण हा रोगच इतका भयानक आहे की, काही गोष्टी बदललेल्या आपल्याला जाणवतही नाही. पूर्वी घरी वृत्तपत्र आल्यानंतर आपण पहिलं पान आणि शेवटचं पान वाचण्याला प्राधान्य द्यायचो. परंतु, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने वृत्तपत्र वाचनाची सवयच बदलून टाकली आहे. आज कोणीही वृत्तपत्र समोर आल्यानंतर सर्वात आधी निधन वार्ता वाचतोय. कारण आता त्यातूनच अनेकांना आपल्या परिचितांच्या निधनाचे वृत्त समजत आहे. पूर्वी या कॉलममध्ये 3 ते 4 निधनाच्या बातम्या येत असत. आज या कॉलमची 'उंची' वाढली आहे. रोज 10 ते 15 निधन वार्ता प्रसिद्ध होत आहेत. वास्तवात...

तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य…

इमेज
प्रशासनातलं नेहमी चर्चेत असणारं नाव...तुकाराम मुंढे...कडक शिस्तीचे आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारे म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी असलेले मुंढेसाहेब...त्यांची धडाकेबाज कामगिरी सुरु झाली असे वाटत असते  अन् लगेच त्यांची बदली केली जाते... मग सरकार कोणाचेही असो... वाद आणि बदली अटळ... साधारणतः दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना असाच वाद झाला होता...राज्यातील सर्व माध्यमांत ते चर्चेचा केंद्रबिंदू ठरले होते... आताही अगदी तसंच आहे...त्यावेळी त्यांच्या झालेल्या बदलीवर लेख लिहिला होता...आज नागपूर महापालिकेची जबाबदारी घेऊन उणीपुरी काही महिने झाली होती...आणि वाद तर सुरुवातीपासूनच सुरु झाले होते..तोच त्यांची पुन्हा बदली झाली आहे...त्यामुळे नवी मुंबईतून बदली झालेल्या वेळचा लेख पुन्हा एकदा वाचकांसाठी... आताही तेच सुरु आहे.. फक्त शहर बदललंय..राजकारणी व्यक्ती बदललीत..पण मुंढे साहेबांचं 'टू बी कंटिन्यूय' सुरुच आहे.. - दिग्विजय जिरगे  रजतमसत्‍व आहे ज्‍याचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥ तम म्‍हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ तुका म्‍हणे येथे सत्‍वाचे सामर्थ्‍य । क...

जिमी जिमी जिमी आजा आजा..

इमेज
विंडिजचा संघ 2018 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात विंडीजची कामगिरी ढासळली होती.  त्यावेळी वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज जिमी अ‍ॅडम्सची आठवण आली होती. त्याच्या कामगिरीवर त्यावेळी लिहिलेला लेख पुन्हा एकदा सादर.. - दिग्विजय जिरगे. हा तोच संघ आहे का ज्याने एकेकाळी आपल्या धारदार गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर जगातील सर्व संघांवर वर्चस्व गाजवले होते..हा प्रश्न सध्याच्या वेस्ट इंडिज संघाकडे पाहिल्यानंतर क्रिकेट रसिकांना पडला असेल. गॅरी सोबर्स, क्लाइव लॉइड, गार्डन ग्रिनिज, व्हिव्ह रिचर्डस, माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, कर्टली अम्ब्रोज, कर्टनी वॉल्श, ब्रायन लारा, चंदरपॉल असे एकशे एक उत्तम दर्जाचे आणि आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी भरवणारे खेळाडू होते. या परंपरेत मोडत नसला तरी आणखी एक खेळाडु होता, ज्याची कामगिरी इतर संघांबरोबर बऱ्यापैकी होती. पण भारताविरोधात मात्र एक्स्ट्रा ऑर्डनरीच होती. तो या महान खेळाडुंच्या पंक्तीत मोडत नसला तरी १९९४ मध्ये भारतीय संघाला घाम फोडणारा तो हाच फलंदाज.. त्याचे नाव जिमी अ‍ॅडम्स.. राजकोटमध्ये अवघ्या ३ दिवसांत टीम इंडियाने विंडीजल...

हा खेळ आकड्यांचा...

इमेज
काही गोष्टी आयुष्यात काही क्षणांसाठी येऊन जातात. पण त्याच्या आठवणी मात्र कायम आपल्याबरोबर राहतात. लेखाची सुरुवात जरी अशी असली तरी पुढचा सगळा भाग अनैतिक गोष्टींचा आहे. अनैतिक (सरधोपट अर्थ घेऊ नका) म्हणजे महाविद्यालयीन जीवनात असताना आम्ही मित्रमंडळींनी काय-काय केलं होतं, त्या आठवणीपैकी एक अशी आठवण जी विसरणं शक्यच नाही..या आठवणींना उजाळा मिळाला तो रतन खत्री नावाच्या एका कुप्रसिद्ध व्यक्तीच्या निधनाच्या बातमीमुळं... आता हा खत्री कशासाठी प्रसिद्ध होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही... खत्रीनं जग सोडलं.. पण त्यापूर्वी म्हणजे सुमारे १८ ते २० वर्षांपूर्वी १५ दिवस तोही आमच्या आयुष्यात येऊन गेला.. त्याने आमच्याकडून आकडेमोड करुन घेतली. त्याचं गणित आम्हाला काही रुचलं नाही किंवा जमलं नाही असंही म्हणता येईल.. पण त्यामुळं सांख्यिकीतज्ज्ञ होता-होता थोडक्यात वाचलो. साधारणतः २०००- २००१ सालची ही गोष्ट आहे.. आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आम्ही काही मित्रांनी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता (वडिलांचं स्वप्न होतं. पोरगं घरात वाद घालताना वकिली पाँईंटने वाद घालतो..त्याला वकिली व्यवसाया...