टीम अण्णांचा राजकीय धोबीपछाड
मागील काही दिवसांपासून टीम अण्णा आणि संसद यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येते. टीम अण्णातील प्रत्येक सदस्य खासदारांच्या विशेषाधिकारालाच आव्हान देत असून, त्यांच्याविरूद्ध ते दररोज काहीना काही तरी वादग्रस्त विधाने करीत आहेत. त्यामुळे संसदेतही टीम अण्णाविरूद्ध मोठया प्रमाणात गोंधळ होत असल्याचे दिसते. शरद यादव, लालुप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यासारख्यांनी टीम अण्णांवर लोकसभेत मोठया प्रमाणावर टीका केली. म्हणजे ज्या पक्षांनी टीम अण्णांच्या लोकपालला संसदेत पाठिंबा दिला होता, तेही आज त्यांच्याविरोधात बोलताना दिसतात. कारण सरळ आहे, टीम अण्णाने त्यांच्या चारित्र्यावरच घाला घातला. त्यामुळे साहजिकच ते विरोधात बोलणारच. पण टीमच्या सदस्यांनी हे जाणूनबुजून केलेले वक्तव्य आहे. त्यांना परिणामांची कल्पना असतानाही त्यांनी असे बोलण्याचे धाडस केले. म्हणजे त्यांनीच संसदेला पर्यायाने खासदारांना कोंडीत पकडण्याचे काम केले आहे. ते कसं? मुंबईतील अयशस्वी उपोषणानंतर काही दिवस अज्ञातवासात गेलेल्या टीमअण्णा ...