पोस्ट्स

टीम अण्‍णांचा राजकीय धोबीपछाड

इमेज
मागील काही दिवसांपासून टीम अण्‍णा आणि संसद यांच्‍यातील वाद विकोपाला गेल्‍याचे दिसून येते. टीम अण्‍णातील प्रत्‍येक सदस्‍य खासदारांच्‍या विशेषाधिकारालाच आव्‍हान देत असून, त्‍यांच्‍याविरूद्ध ते दररोज काहीना काही तरी वादग्रस्‍त विधाने करीत आहेत. त्‍यामुळे संसदेतही टीम अण्णाविरूद्ध मोठया प्रमाणात गोंधळ होत असल्‍याचे दिसते. शरद यादव, लालुप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यासारख्‍यांनी टीम अण्‍णांवर लोकसभेत मोठया प्रमाणावर टीका केली. म्‍हणजे ज्‍या पक्षांनी टीम अण्‍णांच्‍या लोकपालला संसदेत पाठिंबा दिला होता, तेही आज त्‍यांच्‍याविरोधात बोलताना दिसतात. कारण सरळ आहे, टीम अण्णाने त्‍यांच्‍या चारित्र्यावरच घाला घातला. त्‍यामुळे सा‍हजिकच ते विरोधात बोलणारच. पण टीमच्‍या सदस्‍यांनी हे जाणूनबुजून केलेले वक्‍तव्‍य आहे. त्‍यांना परिणामांची कल्‍पना असतानाही त्‍यांनी असे बोलण्‍याचे धाडस केले. म्‍हणजे त्‍यांनीच संसदेला पर्यायाने खासदारांना कोंडीत पकडण्‍याचे काम केले आहे. ते कसं? मुंबईतील अयशस्‍वी उपोषणानंतर काही दिवस अज्ञातवासात गेलेल्‍या टीमअण्‍णा ...

महापालिका रणांगण: नवे कारभारी निवडताना पुणेकरांचाच लागणार कस!

इमेज
तुमचे मत पुणे महापालिकेत कोणता पक्ष सत्तेवर येईल, असे वाटते? कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप-शिवसेना-रिपब्लिकन पक्ष महायुती महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्‍याची जनता 'सवाई' आहे, असे म्‍हटले जाते. परंतु, त्‍यांनीच निवडून दिलेले सत्ताधारी त्‍यांच्‍यापेक्षाही 'सवाई' निघालेत. गेल्‍या पाच वर्षांत विकासाच्‍या नावाखाली सामान्‍यांना झुलवत ठेऊन अनोखा 'पुणे पॅटर्न' राबवून जनतेलाच वेठीस धरणा-या राजकीय पक्षांनी आता 16 फेब्रुवारीसाठी नव्‍याने रणशिंग फुंकलंय. विरोध करण्‍यासाठी विरोधी पक्ष नसलेली पुणे महानगरपालिका कदाचित देशातील एकमेव महानगरपालिका असेल, कारण गेल्या पाच वर्षात येथे जवळपास प्रत्येक पक्षाने सत्तेची ऊब घेतलीये. पुणे शहर खरचं देशातील एक 'अनोखं' शहर ठरू पाहातयं. शहरातील राजकीय परिस्थिती पाहिल्‍यास याचं 'अनोखं'पण आपल्‍या लक्षात येईल. खासदार भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपाखाली तुरूंगात त्‍यामुळे संसदेत शहराचे नेतृत्‍वच नाही तर राष्‍ट्रवादीच्‍या हातात महानगरपालिका असूनही अंतर्गत ग...

महापालिकेचे रणांगणः विकासाची वाट लावणा-या 'पुणे पॅटर्न'ला जीवदान मिळणार?

इमेज
विद्येचे आणि राज्‍याचे सांस्‍कृतिक माहेरघर असलेले पुणे आता राजकारणातील नव्‍या प्रयोगांचेही माहेरघर ठरले आहे. जे पक्ष राज्‍यात एकमेकांविरोधात टीकेची झोड उडवतात तेच पक्ष येथे गळयात गळा घालून सत्‍ता उपभोगताना दिसतात. गंमतीने असे म्‍हटले जाते की, पुणे महापालिकेत सर्वच पक्ष सत्‍ताधारी आणि सर्वच पक्ष विरोधी बाकावर आहेत. 'पुणे पॅटर्न' ने तर राज्‍यात खळबळ माजवून दिली होती. पुण्‍यात राष्‍ट्रवादीची सर्व सूत्रे राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या हातात आहेत. कॉंग्रेसची धूरा इतकेदिवस खासदार सुरेश कलमाडी यांच्‍या हातात होती पण राष्‍ट्रकूल घोटाळयाप्रकरणी तुरूंगात गेल्‍यापासून कॉंग्रेसची नौका नेतृत्‍वाअभावी भरकटत आहे. कॉंग्रेसला पर्यायाने कलमाडींना सत्‍तेवर येऊ द्यायचे नाही या एकमेव ध्‍येयाने पछाडलेल्‍या पवारांनी प्रसंगी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जवळ केले आणि राज्‍यात 'पुणे पॅटर्न' पर्वास सुरूवात केली. शिवसेना आणि भाजपलाही सत्‍तेत येण्‍यासाठी अशा पॅटर्नची गरजच होती. औद्योगिक विकासाबरोबर पुण्‍याच्‍या समस्‍यादेखील मोठयाप्रमाणात वाढल्‍या. माहिती तंत्रज्ञाना...

प्रवास विकासाकडे की महा (भ्रष्ट) राष्ट्राकडे?

इमेज
महाराष्ट्राने नुकतेच आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले . हे वर्ष साजरे करताना सरकारने राज्याच्या प्रगतीचे मोठे गोडवे गायले . जाहिरातींचा भडिमार केला . महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रात कशी प्रगती केली , विकासदर कसा वाढला , याची सचित्र जाहिरातबाजी मोठया प्रमाणात केली . परंतु , वस्तुस्थिती तशी आहे का ? निश्चितच नाही . ज्या प्रगतीचे आपण गोडवे गात आहोत ते सर्व फसवे आहे . आपल्या प्रगतीचा वेग तर मंदावला आहे . पण राज्यातील भ्रष्टाचारानेही टॉप गियर टाकलाय . महाराष्ट्राबरोबरच्या गुजरातने तर प्रगतीत केव्हाच ओव्हरटेक केलायं. ‘बिमारू’ म्हणवणा-या बिहारचाही विकासाचा दर वाढलाय. त्याचवेळी महाराष्ट्राचा प्रवास उलटया दिशेने होतोय. पूर्वी इतर राज्ये आपल्या राज्याची धोरणे ठरवताना महाराष्ट्राचा आदर्श ( घोटाळा नव्हे ) ठेवायचे. सगळया राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली पण ती विकासामध्ये नव्हे तर भ्रष्टाचारामध्ये... एकीकडे देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील अण्णा हजारे प्रयत्न करीत असताना त्यांचाच महाराष्ट्र संपूर्ण देश...

क्रिकेट विश्वकप ........... अण्णा.. ....आइपीएल... विजयी कोण ?

इमेज
परवा एका दुकानात गेलो होतो दुकानामध्ये सतत गर्दी असल्यामुळे येणाऱ्या customer ची करमणूक व्हावी म्हणून तिथे एक टीवी सतत चालू असतो. त्यादिवीशी देखील टीवी चालू होता आणि प्रत्येक news channel वर अन्ना हजारे यांचीच बातमी चालू होती. त्यामुळे सतत वाहिनी बदलून कुठे timepass साठी काय लागले आहे का हे दुकानाचा मालक पाहत होता कारण नुकताच world cup संपल्यामुळे त्यालाही करमत नवते. सगळीकडे अन्ना हजारे पाहून तो थोडा वैथाग्ला आणि त्यानेही भ्रष्टाचाररावर एक कॉमेंट पास केली व आपला भ्रष्टाचाराशी काहीही संबंध नाही अश्यप्रकारचे वक्तव्य केले. (आण्णांनी उपोषण हे भ्रष्टाचारात होर्पल्नार्या सर्वसामान्य लोकांसाठी केलेले आहे म्हणजे त्याच्यासारख्या लोकांसाठी केलेले आहे याची त्याला कदाचित कल्पना नसावी) व टीवी बंद केला.त्याचवेळी दुकानात एक २० ते २५ वयाचा मुलगा होता त्यानेही एक टोकाची comment केली व टीवी बंद केला. मला याचे आश्चर्य वाटले, एकीकडे देशात अण्णानला सर्व थरातून पाठींबा मिळतो student , actor , राजकारणी लोकांचे पाठींबा मिळत असताना हि अशी प्रतिक्रिया एकूण मी चाट पडलो. अण्णा तिथे देशातील जनतेसाठी उपोषण करू...