पोस्ट्स

सामान्य भाजीविक्रेती ठरली शेतकऱ्यांसाठी आदर्श; ३ गुंठ्यात ५२ पिके घेण्याची साधली किमया

इमेज
अपुरा पाऊस, नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे राज्यात आणि देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सरकारकडून कर्जमाफी, पीक विमा आदी योजनांद्वारे बळीराजाला या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण दुसरीकडे मात्र आत्महत्या काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कर्ते पुरूष कंटाळून आत्महत्येचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. पण इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर ही रडगाणी न गाता..अवघ्या काही गुंठ्यात..आदर्श आणि यशस्वी शेती कशी करता येते याचा वस्तूपाठच एका माऊलीने उभा केला आहे. मनीषाताई भांगे असे या माऊलीचे नाव असून त्यांनी खैरेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेती कशी करावी याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. अशिक्षीत असूनही एखाद्या कृषी तज्ज्ञाला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली आहे. हाती तीन एकर माळरान, पाण्याची कमतरता अशा परिस्थितीलाही न डगमगता यशस्वी शेती करत त्यांनी शेतीपूरक उद्योगही उभा केला. अवघ्या ३ गुंठा शेतीत ५२ पिके घेण्याची किमया त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता त्यांनी सेंद्रिय शेती करून प...

सायकल

इमेज
पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत काही ठिकाणी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झालाय.त्यामुळे यंदा पालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज सायकली नाममात्र दरात भाड्याने दिली जात आहेत.. ही कॅशलेस योजना असून यासाठी पेटीएमचा वापर करावा लागतो. यासाठी पेडल ऍप डाउनलोड करावं लागतं. लॉगीन केल्यावर सायकल स्टँडवर किती सायकल उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. जीपीएसमुळे सायकलीचा ठावठिकाणा मिळतो. सायकल स्टँडवर सोडताना ती मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे ऍपच्या माध्यमातून अनलॉक करावी लागते. या सुविधेचा विद्यार्थी आणि युवक मोठ्याप्रमाणात उपयोग करून घेताना दिसतात. इतर शहरांनी या उपक्रमाचे अनुकरण करण्याची गरज आहे. - दिग्विजय जिरगे divijay.jirage@gmail.com  

भारतीय संगीतातील वादळ

इमेज
भारतीय संगीतातील वादळ अल्लारखाँ रहमान अर्थातच ए आर रहमान भारतीय चित्रपटसृष्टीतील दैवी देणगी लाभलेला संगीतकार. संगीतप्रेमी त्याला 'पूर्वेकडचा मोझार्ट' म्हणतात. 'रोजा' चित्रपटापासून सुरू झालेला रहमानचा हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. संगीतरचनेच्या रूढपद्धतीविरूद्ध बंड करणारी कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानावरील हुकूमत लाभलेल्या रहमानचा वैयक्तिक व व्यावसायिक प्रवास अत्यंत नाट्यमय असा आहे. आपल्या जादुई संगीतामुळे सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रहमानबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. परंतु, रहमानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणालाच जास्त माहिती नाही. किंबहुना ती माहिती बाहेर जाऊच नये असाच प्रयत्न केला गेला. 'ए आर रहमान- दी म्युझिकल स्ट्रॉम' या मूळ इंग्रजी व 'ए आर रहमान- संगीतातील वादळ' या मराठी अनुवादित पुस्तकातून एक वाद्य वाजवणारा दिलीप ते ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ए आर रहमान हा प्रवास उलगडण्यात आला आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका कामिनी मथाई या आहेत. तर मिलिंद चंपानेरकर यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे. रहमान व त्याच्...

'अमूल' मॅन- The Amul Man

इमेज
'अमूल' मॅन भारतात 'अमूल' हे नाव माहीत नसलेला व्यक्ती विरळाच. प्रत्येकाच्या घरी आणि ओठी असणारा हा ब्रँड. जगात काहीही घडलं तर त्यावर भाष्य करणाऱ्या 'अमूल'च्या जाहिरातीकडं सर्वांचं लक्ष असतंच. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणं असो किंवा अमूलच्या उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्याचं काम, अगदी इमानेइतबारे ज्यांनी केलं ते डॉ. वर्गीस कुरियन (Verghese Kurien) यांनी. 'माझंही एक स्वप्न होतं..' हे त्यांचं आत्मचरित्र. यात त्यांनी आपलं बालपण ते 'अमूल'च्या उभारणीपासून देशातील धवलक्रांती व त्यानंतरच्या घटनांचा उल्लेख केला आहे. गौरी साळवी यांनी 'आय टू हॅड अ ड्रीम' (I To Had A Dream) या नावानं इंग्रजीत हे पुस्तक लिहिलंय. तर सुजाता देशमुख यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे.  एक अभियंता अपघातानं दुग्ध उत्पादनात आला आणि सहकाराच्या माध्यमातून त्यानं देशात धवलक्रांती घडवली. या वाटचालीत आलेल्या अनुभवाचे कथन या आत्मचरित्रातून होतं. डॉ. कुरियन यांचं ग्रामीण भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. दुग्धोत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्यात त...

देवाचिया द्वारी...लुटुनीया सारे...

इमेज
देवाचिया द्वारी...लुटुनीया सारे... शनी शिंगणापूरला चोऱ्या माऱ्याची भिती नसते. त्यामुळं तेथील घरांना दरवाजेही नसतात म्हणे. पण तेथील ग्रामपंचायतीचे कर्मचारीच (कदाचित कंत्राटदाराचे कर्मचारी असतील) भाविकांबरोबर ग्रामपंचायतीलाही लुटत असल्याचे दिसले. शिंगणापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ग्रामपंचायत २ रूपये प्रवेश कर घेते. टोल नाक्याप्रमाणे आत येतानाच वसुली केली जाते. खासगी वाहनात आलेल्या व्यक्तीं ची शिरगणती करून समोरील व्यक्ती त्याप्रमाणे पैशांची मागणी करतो (मोजून अर्ध्या मिनिटांत ही प्रोसेस होते). जुजबी रक्कम असल्यामुळं कोणी त्या पावतीकडं पाहत ही नाही, असं वाटतं. शनिवारी आमच्याकडून कर घेणाऱ्या व्यक्तीने १० रूपये मागितले आणि पावती चालकाच्या हातात न देता त्याने ती स्पीडोमीटरवर टाकली. वाहन चालकाने हातात घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता, त्या 'करवसुली अधिकाऱ्याने' लगेच पुढे चला मागे वाहनं थांबलीत म्हणून पुढे दामटले.  कदाचित रक्कम कमी असते म्हणून कोणी पाहत नसावे. पण उत्सुकतेपोटी पावती हातात घेऊन पाहिली असता. ती फक्त ४ रूपयांचीच निघाली. म्हणजे त्याने ५ व्यक्तींऐवजी २ व्यक्तींच...

आणेवारी

इमेज
नुकताच एका निवृत्त नायब तहसिलदारांशी भेट झाली. नायब तहसिलदार होण्यापूर्वी त्यांनी काही वर्ष सर्कल ऑफिसर म्हणून काम ही केले होते. आणेवारी कसं काढतात याविषयी त्यांना विचारलं असता अत्यंत भाबडेपणाने त्यांनी आपल्याला त्याचं गणित अजूनही कळालं नसल्याचं सांगितले. इतकी वर्ष काम केलं पण मला ते जमलं नसल्याचं त्यांनी कबूल केलं. तसंच आणेवारी काढताना ती ४५ ते ५५ च्या दरम्यान येईल अशा पद्धतीने संबंधित कर्मचारी काढतो, आणि जो ही आणेवारी काढतो त्यालाही हे समजलेल नसतं हे मात्र त्यांनी आत्मविश्वासाने म्हटलं. हे सर्व सांगणं यासाठी की सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. पण माळशिरस आणि उत्तर सोलापूर या दोन तालुक्यातील आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्यामुळे तिथे दुष्काळ जाहीर होऊ शकलेला नाही. या महाशयांशी बोलल्यानंतर जाणवंल की या भागातील शेतकरी दुष्काळग्रस्तांच्या यादीत का येऊ शकले नाहीत.

भागम भाग

इमेज
१६० किलो वजन (माझ्या स्वत:चे ८५+ पाठीवर ३० ते ४० किलो+ हातात ४० किलो= १६०, वजनात कमी अधिक होऊ शकतं) घेऊन तेही रेल्वेच्या ट्रॅकवरून पळणे किती कठीण असते याचा प्रत्यय मला शनिवारी आला.  चिंचवडवरून लोकलने पुण्याला येण्यासाठी एरवी अर्धा तास लागतो. परंतु शनिवारी जेव्हा मी ४.४५च्या लोकलने पुण्याकडे निघालो तेव्हा तब्बल सव्वा तास वेळ लागला. विशेष म्हणजे मी ज्या रेल्वेने पुढे जाणार होतो ती सहा वाजता निघणार होती. या लोकलने मनाचा मोठेपणा दाखवत दुसऱ्या रेल्वेंना मार्ग देण्यासाठी प्रत्येक ठ िकाणी १० ते १५ मिनिटांचा थांबा घेतला. याचा फटका माझ्यासारख्या अनेक "पापभिरू' प्रवाशांना बसला. ५.४५ला लोकल शिवाजीनगरला आली तेव्हा मला जरा हायसं वाटलं. कारण तिथून अवघ्या ५ मिनिटांत पुणे स्टेशन येते याची खात्री मला होती. परंतु तो दिवसच खराब होता असं म्हणता येईल. पुणे स्टेशन नजरेच्या टप्प्यात (सुमारे अर्धा किमी) होतं. पण लोकलने नेमका इथच घात केला. बया तिथंच थांबली. पुन्हा एका सिग्नलसाठी. त्या संपूर्ण लोकलमध्ये माझ्यासारख्या अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. हे जेव्हा मी लोकलमधून खाली उडी मारली तेव्हा मला ...