पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगातील सर्वात मोठं स्कल्पचर केरळमधील 'जटायू अर्थ सेंटर'

इमेज
केरळ मधील कोल्लम शहरापासून अगदी जवळ जटायू अर्थ सेंटर (Jatayu Earth’s Center) इथं जटायूचं अत्यंत सुंदर आणि मोठं स्कल्पचर ( Jatayu Rock)  आहे. जगातील हे सर्वात मोठं स्कल्पचर असल्याचं सांगितलं जातं. पौराणिक कथेनुसार, ज्यावेळी रावण सीतेचं अपहरण करून नेत होता, त्यावेळी रावणाशी लढताना जटायू पक्षी खाली पडला होता. त्याच ठिकाणी हे स्कल्पचर आहे. हे स्कल्पचर ही अर्ध्या पंखाचं आहे. डोंगरावर हे स्कल्पचर उभारण्यात आलं आहे. हे स्कल्पचर 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 70 फूट उंच आहे. प्रख्यात मल्याळम फिल्ममेकर राजीव आंचल यांनी 15000 स्क्वेअर फूट प्लॅटफॉर्मवर हे उभारलं आहे. सुमारे 896 पायऱ्या चढून वर जावं लागतं. वर 6 D थिएटर, डिजिटल म्युझियम आहे, पण सध्या कोरोना मुळं हे बंद आहे. बाजूला प्रभू श्रीरामाचे रेखीव मंदिर आहे. वर जाण्यासाठी रोप वे ही आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, गेम झोन, आयुर्वेदिक रिसॉर्ट ही आहे. सर्वांनी पाहावं असं हे ठिकाण आहे...वर जाताना प्रत्येकाच्या फिटनेसचा कस लागतो, हे मात्र नक्की.. जवळचं विमानतळः त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सुमारे 52 किमी आहे. जवळचं रेल्वे स्टेशनः कोल्लम...

ब्रँड आणि ब्रँडिंगच्या विश्वाची सफर 'ब्रँडनामा'- Brandnama

इमेज
हल्ली प्रत्येक क्षेत्रात ब्रँड आणि ब्रँडिंगला खूप महत्त्व आलं आहे...स्पर्धा तीव्र झाली आहे..एकाच वस्तूची अनेक उत्पादनं बाजारात आहेत..प्रत्येक जण आपलं उत्पादन वेगळं आणि चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय...प्रत्येकाला त्याच्या उत्पादन, सेवांचा खप वाढवायचा आहे...सगळेजण मार्केटिंग करत आहेत..पण ब्रँडिंगकडे खूप कमी जणांचं लक्ष आहे...स्वतःचा ब्रँड निर्माण करणे ही वरवरची प्रक्रिया नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करुन आपला ब्रँड निर्माण केला जातो. आज ग्राहकांचाही ब्रँडेड वस्तू घेण्याकडे कल असतो. अनेकांचे उत्पादन चांगले असते पण त्यांचा ब्रँड नसल्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ब्रँडचे महत्त्व हळूहळू लोकांना पटायला लागले आहे..आता राजकारणातही ब्रँड तयार होत आहेत.  ब्रँड म्हणजे काय, ब्रँडिंग कसं केलं जातं ? याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात..यासाठी काय करायचं असतं हेही माहीत नसतं. ब्रँडबाबतची इत्यंभूत माहिती सहज, सोप्या भाषेत अभिजित जोग यांनी आपल्या 'ब्रँडनामा' या पुस्तकात मांडली आहे. अभिजित जोग हे जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव. पुण्यात प्रतिसाद कम्युनिकेशनच्या माध्यमातून गेल्या ३०...

कोरोना...वृत्तपत्र आणि बदललेली सवय

इमेज
गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी बदलल्या.. या काळात माझ्या करिअरनेही काही फेरबदल बघितले...सर्व काही सुरळित होत आहे असं वाटत असतानाच पहिल्या लाटेपेक्षाही भयानक अशी दुसरी लाट आली...आणि जवळचे आणि नेहमी संपर्कात असणारी लोकं सोडून जाऊ लागली...हे पचवणं खूपच अवघड होतं...हा आजार आता जवळ पोहोचला आहे...गेल्या वर्षी कोसो दूर असलेला हा कोरोना (Covid-19) आता अगदी दिवाणखान्यात पोहोचला आहे. यामुळे लोकांना सवयी बदलाव्या लागल्या आहेत. म्हणजे काही सवयी बदलाव्या लागल्या तर काही आपोआप बदलल्या.. कारण हा रोगच इतका भयानक आहे की, काही गोष्टी बदललेल्या आपल्याला जाणवतही नाही. पूर्वी घरी वृत्तपत्र आल्यानंतर आपण पहिलं पान आणि शेवटचं पान वाचण्याला प्राधान्य द्यायचो. परंतु, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने वृत्तपत्र वाचनाची सवयच बदलून टाकली आहे. आज कोणीही वृत्तपत्र समोर आल्यानंतर सर्वात आधी निधन वार्ता वाचतोय. कारण आता त्यातूनच अनेकांना आपल्या परिचितांच्या निधनाचे वृत्त समजत आहे. पूर्वी या कॉलममध्ये 3 ते 4 निधनाच्या बातम्या येत असत. आज या कॉलमची 'उंची' वाढली आहे. रोज 10 ते 15 निधन वार्ता प्रसिद्ध होत आहेत. वास्तवात...