पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय संगीतातील वादळ

इमेज
भारतीय संगीतातील वादळ अल्लारखाँ रहमान अर्थातच ए आर रहमान भारतीय चित्रपटसृष्टीतील दैवी देणगी लाभलेला संगीतकार. संगीतप्रेमी त्याला 'पूर्वेकडचा मोझार्ट' म्हणतात. 'रोजा' चित्रपटापासून सुरू झालेला रहमानचा हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. संगीतरचनेच्या रूढपद्धतीविरूद्ध बंड करणारी कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानावरील हुकूमत लाभलेल्या रहमानचा वैयक्तिक व व्यावसायिक प्रवास अत्यंत नाट्यमय असा आहे. आपल्या जादुई संगीतामुळे सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रहमानबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. परंतु, रहमानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणालाच जास्त माहिती नाही. किंबहुना ती माहिती बाहेर जाऊच नये असाच प्रयत्न केला गेला. 'ए आर रहमान- दी म्युझिकल स्ट्रॉम' या मूळ इंग्रजी व 'ए आर रहमान- संगीतातील वादळ' या मराठी अनुवादित पुस्तकातून एक वाद्य वाजवणारा दिलीप ते ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ए आर रहमान हा प्रवास उलगडण्यात आला आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका कामिनी मथाई या आहेत. तर मिलिंद चंपानेरकर यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे. रहमान व त्याच्...

'अमूल' मॅन- The Amul Man

इमेज
'अमूल' मॅन भारतात 'अमूल' हे नाव माहीत नसलेला व्यक्ती विरळाच. प्रत्येकाच्या घरी आणि ओठी असणारा हा ब्रँड. जगात काहीही घडलं तर त्यावर भाष्य करणाऱ्या 'अमूल'च्या जाहिरातीकडं सर्वांचं लक्ष असतंच. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणं असो किंवा अमूलच्या उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्याचं काम, अगदी इमानेइतबारे ज्यांनी केलं ते डॉ. वर्गीस कुरियन (Verghese Kurien) यांनी. 'माझंही एक स्वप्न होतं..' हे त्यांचं आत्मचरित्र. यात त्यांनी आपलं बालपण ते 'अमूल'च्या उभारणीपासून देशातील धवलक्रांती व त्यानंतरच्या घटनांचा उल्लेख केला आहे. गौरी साळवी यांनी 'आय टू हॅड अ ड्रीम' (I To Had A Dream) या नावानं इंग्रजीत हे पुस्तक लिहिलंय. तर सुजाता देशमुख यांनी मराठीत याचा अनुवाद केला आहे.  एक अभियंता अपघातानं दुग्ध उत्पादनात आला आणि सहकाराच्या माध्यमातून त्यानं देशात धवलक्रांती घडवली. या वाटचालीत आलेल्या अनुभवाचे कथन या आत्मचरित्रातून होतं. डॉ. कुरियन यांचं ग्रामीण भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. दुग्धोत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्यात त...

देवाचिया द्वारी...लुटुनीया सारे...

इमेज
देवाचिया द्वारी...लुटुनीया सारे... शनी शिंगणापूरला चोऱ्या माऱ्याची भिती नसते. त्यामुळं तेथील घरांना दरवाजेही नसतात म्हणे. पण तेथील ग्रामपंचायतीचे कर्मचारीच (कदाचित कंत्राटदाराचे कर्मचारी असतील) भाविकांबरोबर ग्रामपंचायतीलाही लुटत असल्याचे दिसले. शिंगणापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ग्रामपंचायत २ रूपये प्रवेश कर घेते. टोल नाक्याप्रमाणे आत येतानाच वसुली केली जाते. खासगी वाहनात आलेल्या व्यक्तीं ची शिरगणती करून समोरील व्यक्ती त्याप्रमाणे पैशांची मागणी करतो (मोजून अर्ध्या मिनिटांत ही प्रोसेस होते). जुजबी रक्कम असल्यामुळं कोणी त्या पावतीकडं पाहत ही नाही, असं वाटतं. शनिवारी आमच्याकडून कर घेणाऱ्या व्यक्तीने १० रूपये मागितले आणि पावती चालकाच्या हातात न देता त्याने ती स्पीडोमीटरवर टाकली. वाहन चालकाने हातात घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता, त्या 'करवसुली अधिकाऱ्याने' लगेच पुढे चला मागे वाहनं थांबलीत म्हणून पुढे दामटले.  कदाचित रक्कम कमी असते म्हणून कोणी पाहत नसावे. पण उत्सुकतेपोटी पावती हातात घेऊन पाहिली असता. ती फक्त ४ रूपयांचीच निघाली. म्हणजे त्याने ५ व्यक्तींऐवजी २ व्यक्तींच...