पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

इमेज
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या होऊन आज 34 वर्षे झाली. ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी मी शाळेत होतो. राजकारण आताही कळत नाही आणि तेव्हाही कळत नव्हतं. पण राजीव गांधींबद्दल जबरदस्त आकर्षण होतं. त्यामुळं त्यांची हत्या झाली कळल्यावर खूप हळहळ वाटली होती. नेमकं आत्ताच "राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट?" हे फराझ अहमद लिखित आणि अवधूत डोंगरे अनुवादित मराठी पुस्तक वाचण्यात आलं. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २१ मे १९९१ रोजी झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर एक संशयास्पद आणि धक्कादायक दृष्टिकोन या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. राजीव गांधीबद्दल असं काही होऊ शकतं असा विचारही सर्वसामान्यांच्या मनात येणार नाही. परंतु, पुस्तकात जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावरून आपल्याही मनात शंका यायला सुरूवात होते. लेखकानं अधिकृत तपासण्या आणि अहवालांमध्ये नोंदवलेल्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या हत्येमागे केवळ एलटीटीईचाच हात नव्हता, तर भारतातील काही अंतर्गत शक्तींचाही सहभाग असू शकतो, असा दावा केला आहे. पुस्तकात लेखकाने विविध तपशील, पुरावे आणि घटनांची साखळी उलगडत, या हत्येच्य...