पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भागम भाग

इमेज
१६० किलो वजन (माझ्या स्वत:चे ८५+ पाठीवर ३० ते ४० किलो+ हातात ४० किलो= १६०, वजनात कमी अधिक होऊ शकतं) घेऊन तेही रेल्वेच्या ट्रॅकवरून पळणे किती कठीण असते याचा प्रत्यय मला शनिवारी आला.  चिंचवडवरून लोकलने पुण्याला येण्यासाठी एरवी अर्धा तास लागतो. परंतु शनिवारी जेव्हा मी ४.४५च्या लोकलने पुण्याकडे निघालो तेव्हा तब्बल सव्वा तास वेळ लागला. विशेष म्हणजे मी ज्या रेल्वेने पुढे जाणार होतो ती सहा वाजता निघणार होती. या लोकलने मनाचा मोठेपणा दाखवत दुसऱ्या रेल्वेंना मार्ग देण्यासाठी प्रत्येक ठ िकाणी १० ते १५ मिनिटांचा थांबा घेतला. याचा फटका माझ्यासारख्या अनेक "पापभिरू' प्रवाशांना बसला. ५.४५ला लोकल शिवाजीनगरला आली तेव्हा मला जरा हायसं वाटलं. कारण तिथून अवघ्या ५ मिनिटांत पुणे स्टेशन येते याची खात्री मला होती. परंतु तो दिवसच खराब होता असं म्हणता येईल. पुणे स्टेशन नजरेच्या टप्प्यात (सुमारे अर्धा किमी) होतं. पण लोकलने नेमका इथच घात केला. बया तिथंच थांबली. पुन्हा एका सिग्नलसाठी. त्या संपूर्ण लोकलमध्ये माझ्यासारख्या अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. हे जेव्हा मी लोकलमधून खाली उडी मारली तेव्हा मला ...

'ते' दिवस

इमेज
मागचा पंधरवडा खूप भयावह गेला. दवाखाना कशाशी खातात माहीत नसलेला मी थेट आयसीयूचा अनुभव घेऊन आलो. (तसा अधूनमधून मी डॉक्‍टरांकडे जायचो पण आजारापेक्षा चेहऱयावरचे डाग, पोट साफ होत नाही किंवा जरा जास्‍तच साफ होतंय.. या पलीकडे कधी प्रसंगच आला नाही.) परवा अशाच काही कारणासाठी डॉक्‍टरांकडे गेलो होतो. तेव्‍हा त्‍यांनी त्‍यांच्‍या लॅपटॉपवर माझी शेवटची नोंद दोन वर्षांपूर्वीची दाखवली (सध्‍या डॉक्‍टरांकडे ही एक चांगली सोय असते). शिवाय इतक्‍यात कोणाला पाहण्‍यासाठी हॉस्‍पीटलची चक्‍कर ही झाली नव्‍हती. मग हे झालंच कसं ? तसा मी दिसायला तर एकदम धष्‍टपुष्‍ट. वजन चांगल 85 किलो (चूकभूल देणेघेणे). खाण्‍याच्‍या बाबतीतही एकदम चोंखदळ. (शेलका माल जरा जास्‍त लागतो). पण सातत्‍याचा अभाव. म्‍हणजे कसं वेळेवर काही खाणं नाही. आणि पत्रकारितेत असल्‍यामुळे झोपेचे त्रांगडं. भविष्‍यात ते कधी जमेल असं वाटतही नाही. तर मग झालं असं आदल्‍यादिवशी रात्री पानं लावून (पान लावणे हे वृत्‍तपत्रात काम करणाऱयांना वेगळं सांगण्‍याची गरज नाही) घरी जाण्‍यास थोडा उशीरच झाला. खरं म्‍हटलं तर कामानंतरच्‍या गप्‍पांमुळे हा उशीर झाला. म्‍हणजे र...

सत्‍तेची ऊब आणि बदलीचे राजकारण..

इमेज
अखेर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्‍त चंद्रकांत गुडेवार यांची बदल झालीच. राजकारणात वैयक्तिक महत्‍वकांक्षेसमोर कुणाचे काही चालत नसते हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले. जे कालपर्यंत गुडेवार यांचे समर्थक होते. त्‍यांनीच गुडेवारांच्‍या बदलीचा प्रश्‍न प्रतिष्‍ठेचा केला होता. सत्‍तेची उब मिळाली की माणूस कसा बदलतो याचे हे मुर्तिमंत उदाहारण. यापूर्वी जे कॉंग्रेसला जमले नाही ते भाजपने करून दाखवले. निमित्‍त काय तर मुदत संपलेल्‍या महापालिकेच्‍या गाऴयांचा लिलाव. हे गाळेधारकच पालिकेचे उत्‍पन्‍न बुडवत होते. अशा वेळेस सत्‍ताधाऱयांनी आयुक्‍तांना साथ देणे अपेक्षित असताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मात्र वैयक्तिक आकसापोटी ताकद पणाला लावून बदली केली. भविष्‍यात आपल्‍या या ताकदीच्‍या सोलापूरच्‍या विकासासाठी ते किती उपयोग करतील हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून पालिकेतील वातावरण तसं गुडेवार यांच्‍या विरोधातच चालंल होतं. गुडेवार यांच्‍यामुळे ज्‍यांची ज्‍यांची दुकानदारी बंद झाली होती. ती मंडळी एकत्र येत होती. तिथेच त्‍यांच्‍यासाठी धोक्‍याची घंटा वाजली होती. गेल्‍या आठवड़़यातच गुडेव...