पोस्ट्स

सप्टेंबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवास विकासाकडे की महा (भ्रष्ट) राष्ट्राकडे?

इमेज
महाराष्ट्राने नुकतेच आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले . हे वर्ष साजरे करताना सरकारने राज्याच्या प्रगतीचे मोठे गोडवे गायले . जाहिरातींचा भडिमार केला . महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रात कशी प्रगती केली , विकासदर कसा वाढला , याची सचित्र जाहिरातबाजी मोठया प्रमाणात केली . परंतु , वस्तुस्थिती तशी आहे का ? निश्चितच नाही . ज्या प्रगतीचे आपण गोडवे गात आहोत ते सर्व फसवे आहे . आपल्या प्रगतीचा वेग तर मंदावला आहे . पण राज्यातील भ्रष्टाचारानेही टॉप गियर टाकलाय . महाराष्ट्राबरोबरच्या गुजरातने तर प्रगतीत केव्हाच ओव्हरटेक केलायं. ‘बिमारू’ म्हणवणा-या बिहारचाही विकासाचा दर वाढलाय. त्याचवेळी महाराष्ट्राचा प्रवास उलटया दिशेने होतोय. पूर्वी इतर राज्ये आपल्या राज्याची धोरणे ठरवताना महाराष्ट्राचा आदर्श ( घोटाळा नव्हे ) ठेवायचे. सगळया राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली पण ती विकासामध्ये नव्हे तर भ्रष्टाचारामध्ये... एकीकडे देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील अण्णा हजारे प्रयत्न करीत असताना त्यांचाच महाराष्ट्र संपूर्ण देश...