पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आणेवारी

इमेज
नुकताच एका निवृत्त नायब तहसिलदारांशी भेट झाली. नायब तहसिलदार होण्यापूर्वी त्यांनी काही वर्ष सर्कल ऑफिसर म्हणून काम ही केले होते. आणेवारी कसं काढतात याविषयी त्यांना विचारलं असता अत्यंत भाबडेपणाने त्यांनी आपल्याला त्याचं गणित अजूनही कळालं नसल्याचं सांगितले. इतकी वर्ष काम केलं पण मला ते जमलं नसल्याचं त्यांनी कबूल केलं. तसंच आणेवारी काढताना ती ४५ ते ५५ च्या दरम्यान येईल अशा पद्धतीने संबंधित कर्मचारी काढतो, आणि जो ही आणेवारी काढतो त्यालाही हे समजलेल नसतं हे मात्र त्यांनी आत्मविश्वासाने म्हटलं. हे सर्व सांगणं यासाठी की सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. पण माळशिरस आणि उत्तर सोलापूर या दोन तालुक्यातील आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्यामुळे तिथे दुष्काळ जाहीर होऊ शकलेला नाही. या महाशयांशी बोलल्यानंतर जाणवंल की या भागातील शेतकरी दुष्काळग्रस्तांच्या यादीत का येऊ शकले नाहीत.